मैत्रीबोध परिवाराने पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या आत्म शांतीसाठी मैत्रीबोध परिवाराद्वारे श्रद्धांजली यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित या श्रद्धांजली यात्रेत 'एक भारत, हम भारत' चा संदेश देण्यात आला. काजल अग्रवाल, मकरंद देशपांडे, अदिती पोहनकर यांनीही या यात्रेत सहभागी होत उपक्रमाला पाठिंबा देत प्रेम आणि एकतेचा संदेश दिला. मुंबईसह नवी दिल्ली, अमृतसर आणि पहलगाम येथे मैत्रीबोध परिवादाद्वारे आयोजित श्रद्धांजली यात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.