लिव्हप्युअरची दमदार कामगिरी
~ महसूलामध्ये वार्षिक ३९ टक्के वाढीची नोंद ~
मुंबई, २१ मे २०२५: लिव्हप्युअर या भारतातील आघाडीच्या आणि ग्राहक स्वास्थ्याप्रती समर्पित सर्वात विश्वसनीय ग्राहक-केंद्रित ब्रँडने अप्लायन्सेस व सर्विस बिझनेसमधील महसूलामध्ये प्रबळ वार्षिक ३९ टक्के वाढीची नोंद केली आहे. मोठी ग्राहक मागणी, विस्तारीत उत्पादन लाइन्स आणि सखोल बाजारपेठ प्रवेशामुळे हे यश शक्य झाले आहे. कंपनीच्या अपवादात्मक कामगिरीसह ईबीआयटीडीएमध्ये ३८९ टक्क्यांची प्रबळ वाढ झाली आहे, ज्यामधून यशस्वी व्यवसाय कामगिरी दिसून येते.
लिव्हप्युअरची प्रबळ कामगिरी उत्पादन श्रेणी आणि विक्री चॅनेल्समध्ये निदर्शनास आली. वॉटर प्युरिफायर विभागामध्ये १७ टक्क्यांची वाढ झाली, तर किचन अप्लायन्सेस विभागामध्ये २४८ टक्क्यांची अद्भुत वाढ झाली आणि एअर कूलर्स विभागाने उल्लेखनीय १०० टक्के वाढीची नोंद केली. ब्रँडने सर्व प्रमुख चॅनेल्समध्ये प्रबळ वाढ पाहिली, जेथे जनरल ट्रेडमध्ये ५५ टक्क्यांची वाढ झाली, मॉडर्न ट्रेडमध्ये ६६ टक्क्यांची, तर ई-कॉमर्समध्ये ४४ टक्क्यांची वाढ झाली आणि कंपनीच्या नाविन्यपूर्ण वॉटर-अॅज-ए-सर्विस (डब्ल्यूएएएस) मॉडेलने ४९ टक्क्यांची प्रभावी वाढ केली.
कंपनीच्या विकासाप्रती योगदान दिलेल्या घोषणांची पुनरावृत्ती करत लिव्हप्युअरने आपल्या कॅटालिस्ट गुंतवणूक धोरणाच्या माध्यमातून एमअँडजी इन्व्हेस्टमेंट्सकडून फंडिंगमध्ये २०८ कोटी रूपये सुनिश्चित केले आहेत, तसेच एनक्यूबेट कॅपिटल पार्टनर्सकडून २५ कोटी रूपये मिळवले आहेत. ही धोरणात्मक गुंतवणूक लिव्हप्युअरसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरली, ज्यामुळे ब्रँड श्रेणीच्या विस्तारीकरणाला गती देण्यासाठी, आरअँडडीच्या माध्यमातून नाविन्यतेला चालना देण्यासाठी आणि होम वेलनेस श्रेणीमध्ये एकूण ग्राहक अनुभव वाढवण्यासाठी सक्षम झाला आहे.
लिव्हप्युअरचे व्यवस्थापकीय संचालक राकेश कौल म्हणाले, “मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५ मध्ये लिव्हप्युअर अप्लायन्सेस व सर्विस बिझनेसमधील ईबीआयटीडीएमध्ये ३८९ टक्क्यांची वाढ आणि महसूलामध्ये ३९ टक्क्यांची वाढ ही फक्त आकडेवारी नाही तर सर्वोत्तम परिवर्तनाचे निर्देशक आहेत. लिव्हप्युअरमध्ये आम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यता, विश्वास आणि दीर्घकालीन मूल्याला प्राधान्य देत होम वेलनेस ब्रँड असण्याच्या महत्त्वाला नव्या उंचीवर घेऊन जात आहोत. समकालीन मॉडेल्समध्ये बदल घडवून आणण्याच्या, विकसित होत असलेल्या ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्याच्या आणि शाश्वत विकासामध्ये गुंतवणूक करण्याच्या आमच्या धाडसी निर्णयांमुळे हा टप्पा गाठण्यात आला आहे. आम्ही पुढे जात भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी वेलनेस प्रभावी व सहजसाध्य करण्याच्या मोठ्या दृष्टिकोनाला प्राधान्य देऊ.''